विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : तुषार पाटील
राज्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज ३१,६२८ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे.सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच केंद्र सरकारचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आभार मानले.
राज्यातील आपत्तीमुळे शेत जमीन खरडून गेली,शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाला आहे.अश्यात सरकारने दिलेले नवे हे पॅकेज नवसंजीवनी ठरेल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
या पॅकेजमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट ६,१७५ कोटींची मदत, कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर १८,५००, हंगामी बागायतीसाठी २७,०००, तर कायम बागायतीसाठी ३२,५०० अशी तरतूद आहे. सर्व शेतकऱ्यांना बियाणे व इतर कामांसाठी १०,००० प्रति हेक्टर मदत मिळणार आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विम्यामधून प्रति हेक्टर १७,००० दिले जाणार आहे. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७,००० रोख व ३ लाख नरेगामार्फत प्रति हेक्टर मदत दिली जाईल. जनावरांच्या नुकसानीसाठी ३७,५०० प्रती जनावर (अट रद्द करून), दुकानदारांना ५०,०००, तर विहिरींच्या नुकसानीसाठी ३०,००० प्रति विहीर भरपाई करण्यात येईल. तसेच पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी तब्बल १०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दुष्काळी उपाययोजना मधील कर्ज वसुलीसाठी स्थगिती, फी माफी सुद्धा लागू करण्यात आली आहे.पिकविम्याचे पैसेसुध्दा वेगळे देण्यात येणार आहेत.
केंद्र आणि राज्य मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या हातभारामुळे ग्रामीण भाग आणि शेतकरी आत्मविश्वासाने उभा राहील अशी मला खात्री असल्याचे उपाध्यक्ष बनसोडे म्हणालेत.