ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात…

अधिक वाचा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांदण रस्त्यांसाठी माती, खडी रॉयल्टी फ्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री…

अधिक वाचा

कांचा गचीबोवलीची 400 एकर वन जमिनीवर बुलडोझर 

तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गचीबोवली येथील 400 एकर हिरवळीच्या वनजमिनीची सफाई सुरू केल्यावर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला आहे.  हैदराबाद : उच्च न्यायालयात खटला सुरू असतानाही, तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गाचीबोवली येथील 400 एकर वनजमिनीची मंजुरी सुरू केल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला. प्रस्तावित लिलावाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा…

अधिक वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास…

अधिक वाचा

शेकापुर बाई नदीतील 5 कोटींच्या वाळूवर माफियांचा डल्ला

वर्धा जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झाला नसूनही कोट्यवधीची वाळू तस्करी शेकापुर बाई या नदीवरून सर्रास होत आहे. दिवसाला 100 ट्रक वाळूचा उपासा या घाटावरून होत असल्याचं चित्र आहे.  महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळू उपसा केला जातोय. स्थानिक पोलिसांनी वाळू उत्खननावर छापेमारी केली. मुद्देमालासह वाळू जप्त करण्यात आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी…

अधिक वाचा

महसुल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच शेकापुर बाई घाटात वाळूची तस्करी 

राज्य शासनाचे वाळू धोरण अद्याप जाहीर झाले नाही. परिणामी वाळू तस्करांचा धुमाकूळ राज्यभरात सुरूच आहे. हिंगणघाट येथील वाळू तस्करांकडून नुकतेच 22.61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विना परवानगी शेकापुर बाई नदीला पोखरण्याच्या घटना उघड झाल्या आहे. मात्र, त्यानंतरही अजूनही वाळू तस्कर सक्रिय आहे. वर्धा : वणा नदीच्या शेकापुर बाई घाटातून वाळूची चोरी सर्रास चोरी केली जात…

अधिक वाचा

यशवंत पंचायतराज अभियानात तिवसा पंचायत समिती अमरावती विभागातुन प्रथम

अमरावती : यशवंत पंचायतराज अभियान सन 2024-25 अंतर्गत अमरावती विभागाचा निकाल विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती व्दारे जाहीर झाला असुन, त्यानुसार विभागातील 56 पंचायत समित्यांपैकी पंचायत समिती, तिवसा ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असल्याने पंचायत समिती तिवसा 11 लाख रुपयाचे बक्षीसाकरीता पात्र ठरली आहे. महाराष्ट्र शासनाव्दारे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान बक्षीस योजना राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या…

अधिक वाचा

जुने वाहन स्क्रॅप केल्यास 15 टक्के कर सवलत

मुंबई : स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.    नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून 8 वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून 15…

अधिक वाचा

लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार

मुंबई : राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्त्यावरील वाहन…

अधिक वाचा

महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा आरएसएसचा डाव 

मुंबई : राज्यात नरेंद्र मोदी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करायला आले आहेत, असे वाटते. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी धार्मिक तेढ वाढवण्यासाठी बीडमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एका मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, यात दोन आरोपींना पकडले गेले. दुसऱ्या बाजूला, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहचा मालेगावातच आज जाहीर सत्कार करून ‘हिंदूवीर’…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group