PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा

Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा

americaambedkarjayanti; विकास तातड यांचा 134 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त अमेरिकेतिल जर्सी सिटी महापौरांकडून गौरव

जर्सीसिटी : (america ambedkar jayanti) विकास तातड यांना सामाजिक न्याय, शैक्षणिक समता व मानवाधिकारांच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जर्सी सिटीचे महापौर स्टिव्हन एम. फुलोप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गौरवप्रमाणपत्र प्रदान केले. या सन्मानादरम्यान त्यांच्या 10 वर्षांहून अधिक काळातील धोरणात्मक उपक्रमांनी व परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यक्रमांनी वंचित घटकांच्या जीवनात साधलेला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव विशेष…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती

Jansuraksha; जनसुरक्षा कायद्याची गरज नाही, जुलमी कायदा रद्दच करा

Jansuraksha मुंबई ः (Jansuraksha) जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती मुंबईत स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याशिवाय त्यांचे मित्र पक्ष असलेल्या इतर पक्षांच्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या सहभाग असून, मंगळवारी राज्यभर व मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा दिला आहे. जनसुरक्षेच्या नावावर…

अधिक वाचा
हर घर जल, हर नल जल योजना

NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा

मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…

अधिक वाचा

Pankajbhoyar; गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट, रेती तस्करांवर प्रशासनाचा “अंकुश” नाही 

वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे….

अधिक वाचा

MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम 

मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group