चॅटजिपीटी वापरून घिबळी स्टाईल फोटोचा समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग

देशात झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असतांना, नुकतेच चॅटजिपीटीचा वापर करून घिबळी स्टाईल फोटो बदलवण्याचा ट्रेंन्ड सुरू आहे. यामध्ये पंतप्रधानांसह देशभरातील नेते, सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. समाजमाध्यमांवरील प्रत्येक सोशल हँन्डलवर घिबळी स्टाईल फोटो दिसून येत आहे. अनेक जण आपल्या परिवारासोबतचे फोटो घिबळी स्टाईल करून समाजमाध्यमांवर व्हायरल करतांना दिसून येत आहे.

अधिक वाचा

शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात  याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका,…

अधिक वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौऱ्यावर 

देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे. त्यामुळे नागपूरात हिंसाचारच्या घटनेनंतर शहरातील ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची सर्वत्र  चर्चा आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या…

अधिक वाचा

सीईटी परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित अफवांना बळी पडू नका 

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एमबीए, एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून अवांछित कॉल (Spam Call) च्या माध्यमाद्वारे उमेदवारांना गैरप्रकारे पर्सेंटाईल वाढवून देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींची तातडीने  दखल घेवून एफआयआर दाखल केला आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे. परंतु याबाबत काही समाजमाध्यमांवर…

अधिक वाचा

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि डौलाने उभारूया

मुंबई : गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी अशीच उंच आणि डौलाने उभारूया असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि…

अधिक वाचा

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मान्यवरांचे सलोख्याचे आवाहन

सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढी पाडवा!  पण राजकीय – सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.  महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवरायांनी त्याची पायाभरणी केली; संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई,…

अधिक वाचा

आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन 

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे…

अधिक वाचा

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच करायला हवी

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच  करायला हवी. प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला आणि दैनदिन वापरात सिंगल युज प्लास्टिक चा वापर करणे टाळले,नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर केला,विजेचा अतिरिक्त वापर टाळला , पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले , तर रहिवासी संकुलानी सांडपाण्याचा  पुन:र्वापर  सोसायटीतील झाडांसाठी केला तर आपल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावेल असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…

अधिक वाचा

नेपाळमध्ये राजेशाही बहालीसाठी हिंसक निदर्शने:काठमांडूत कर्फ्यू

नेपाळमध्ये राजेशाही बहालीच्या मागणीसाठी शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूच्या तिनकुनेमध्ये हजारो राजेशाही समर्थक रस्त्यावर उतरले आणि एका इमारतीची तोडफोड केली. नंतर तिला पेटवून दिले. पोलिसांवर दगडफेक केली. सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आआे, देश बचाआे, ‘भ्रष्ट…

अधिक वाचा

म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेलं भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकलं आहे. त्यातच म्यानमारवासियांवर शुक्रवारी आणखी एक संकट कोसळलं. म्यानमार व शेजारच्या थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा बळी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group