Govt Vehicle Misuse नवऱ्याच्या कारनाम्यामुळे वनाधिकारी महिलेची आवडती पदस्थापना रखडणार ? 

Share

सरकारी वाहनाचा गैरउपयोग भोवणार 

नेत्वा धुरी

मुंबई : Govt Vehicle Misuse बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांचे वादग्रस्त पती पवन पाटील यांनी सरकारी वाहनाचा गैरउपयोग केल्याने मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठवड्याभरातच रेवती कुलकर्णी पाटील पदस्थापनेस पात्र आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना कांदळवनात उपवनसंरक्षक पद हवे आहे. आता या बदलीवर गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे.

उद्यानातील मजुरांचाही घरकामासाठी गैरवापर Govt Vehicle Misuse

वनविभागाची सरकारी वाहन वापरुन विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांच्या पतीने उद्यानाबाहेर लॉण्ड्री दुकानदारांना मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायल झाला. पवन पाटील हे कृषी विभागात कार्यरत असताना लाच घेतल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहेत. ही वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही पवन पाटील यांनी पत्नीच्या सरकारी वाहनाचा गैरउपयोग केला, या वादानंतर उद्यानातील मजूरांना पाटील कुटुंबीय बेकायदेशीररित्या घरकामांना राबवून घेत असल्याचे उघडकीस आले. 

यापैकी एका मजुराने मानसिक जाचाला कंटाळून गेल्या वर्षी उद्यान प्रशासनाला पत्र लिहिले. या पत्रात मला दुसरीकडे काम द्या, असा स्पष्ट उल्लेख आहे. उद्यान प्रशासनाला विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील या बेकायदेशीरपणे वनमजूरांना खासगी कामासाठी वापरत असल्याचे अगोदरपासूनच माहित असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनमजूराच्या प्रकरणावरुन उद्यान प्रशासनही गोत्यात येण्याची शक्यता आहे.

काही आठवड्यापूर्वी राज्यातील विभागीय वनाधिका-यांची पदोन्नती जाहीर झाली. या पदोन्नतीमुळे रेवती कुलकर्णी पाटील यांची विभागीय वनाधिकारी या पदावरून उपवनसंरक्षक पदावर पदोन्नती झाली. पतीच्या वागणूकीने नवा वाद ओढावल्याने आता कांदळवनात पदोन्नती मिळणे कठीणच असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

व्हिडिओ व्हायरल होताच उद्यानातून पळ

गेल्या शनिवारी पवन पाटील यांनी उद्यानाबाहेर लॉण्ड्रीच्या दुकानदारांना मारहाण केली. हे प्रकरण पोलिस स्थानकापर्यंत पोहोचले. दुकानदारांनी या प्रकरणी आटोपती भूमिका घेतल्याने पवन पाटील यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली नाही.  बदनामीला घाबरुन रेवती कुलकर्णी सर्व कुटुंबीयांसह मुंबईबाहेर निघून गेल्या. सोमवारी उशिराने त्या उद्यानात परतल्या. उद्यान प्रशासन या लेटमार्कबद्दल कारवाई करणार का, असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group