मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आज “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या घोषवाक्याखाली मोदी हटाव देश बचाव आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. देशाच्या सार्वभौमत्व, आर्थिक धोरणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे.
